चंद्रपुरात शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसाने जण जीवन विस्कळीत झाले काही दिवस उसंत घेतल्या नंतर अचानक पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे चंद्रपूरकरांची मोठी पंचायत झाली शुक्रवारी दुपारी अचानक मेघ दाटून आले आणि मुसळधार पावसाळा सुरुवात झाली.
गेली चार पाच दिवस पावसाने उसंत घेतल्याने आता छान उन्ह तापेल आणि वातावरण सामांन्य राहील हि कल्पना फार काळ टिकली नाही त्यामुळे नागरिकांना फार मनस्ताप सहन करावा लागला टप्प्या टप्प्याने आलेल्या या मुसळधार पावसाने शहर वासियांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले



