वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना आज रविवारी सकाळी नकोडा येथील रेती घाट परिसरात घडली .या परिसरात वाघ ठाण मांडून असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे . त्यामुळे वनविभागाने तात्काळ या वाघाच्या बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे .
नकोडा येथील मधुकर अवधान यांची गाय रेती घाट परिसरात फिरत होती . सकाळचा सुमारास झुडपात दबा धरुन बसलेल्या वाघाने गायवर हल्ला करून गंभीर जखमी केले . मधुकर अवधान यांचे जवळपास ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे . नुकसानीची तातडीने भरपाई देण्याची मागणी माजी सभापती ब्रिजभुषण पाझारे व सरपंच किरण बांदुरकर यांनी वनविभागाकडे केली आहे.



